top of page

घे ना उसंत ..

वेध शाळेलाही

देतोस चकवा,

घोर लागतो

बळीराजाच्या जीवा...


तुझ्या आगमनाची

वाट पाहतात,

होताच आगमन

सारेच नटतात...


तुझ्या मुळे

सौंदर्य खुलते,

सृष्टी नवीन

नव्याने उपजते...


आलास तर

असा येतोस,

जीव नकोसा

करून टाकतोस...


अविश्रांत

कोसळलास,

कोसळून

दमलास...


आता वाटतं तू

थोडी उसंत घ्यावी,

हाताशी आला घास

त्याची न व्हावी माती...

~~~~~~

कवी डॉ.संजय जमदाडे,

लातूर ४१३ ५१२

0 views0 comments

Recent Posts

See All

साठीच्या उंबरठ्यावर मी खूप खुश आहे, आता साऱ्या जबाबदारीतून मी मुक्त झालो आहे... मुलं शिकली मोठी झाली, स्वतःचं बरं वाईट समजायला लागली... दोनाचे चार त्यांचे हात झाले, आता ते संसारात रमायला लागले... त्या

साखर झोपेतलं स्वप्नही हल्ली फोल लागलं ठरायला, सांगा दोष काय त्याचा ? दर्जाही लागला ढळायला... साखर झोपेतलं स्वप्न पूर्वी उतरायचं सत्यात, आता ते स्वप्नच दिवा स्वप्न ठरू लागलीत... काळाच्या ओघात माणूस कि

घे निरोप जाता जाता हे लोटणाऱ्या वर्षा जे काही घडले घडविले इति: त्याची करून जा स्वागत आपण करूया आता नूतन वर्ष येता करुनी दूर द्वेष मनाचा विचार करू देश हिताचा होता एक सारी जनता तमा कशाची बाळगता सर्व जमे

bottom of page