top of page

जेव्हा मन बेचैन असते..

जेव्हा मन

बेचैन असते,

तेव्हा तेव्हा

काव्य स्फुरते...


मन जेव्हा

अस्थिर असते,

तेव्हा अपसुकच

व्यक्त होते...


घालमेल मनाची

रुंजी घालते,

मन तेथे

माझे स्थिरावते...


मनातला राग

कवितेने शमतो,

दाबलेला हुंदका

विरून जातो...


कविता माझा

जीव की प्राण,

तिनेच वाढवला

माझा सन्मान...

~~~~~

कवी डॉ. संजय जमदाडे

लातूर - ४१३५१२

0 views0 comments

Recent Posts

See All

साठीच्या उंबरठ्यावर मी खूप खुश आहे, आता साऱ्या जबाबदारीतून मी मुक्त झालो आहे... मुलं शिकली मोठी झाली, स्वतःचं बरं वाईट समजायला लागली... दोनाचे चार त्यांचे हात झाले, आता ते संसारात रमायला लागले... त्या

साखर झोपेतलं स्वप्नही हल्ली फोल लागलं ठरायला, सांगा दोष काय त्याचा ? दर्जाही लागला ढळायला... साखर झोपेतलं स्वप्न पूर्वी उतरायचं सत्यात, आता ते स्वप्नच दिवा स्वप्न ठरू लागलीत... काळाच्या ओघात माणूस कि

घे निरोप जाता जाता हे लोटणाऱ्या वर्षा जे काही घडले घडविले इति: त्याची करून जा स्वागत आपण करूया आता नूतन वर्ष येता करुनी दूर द्वेष मनाचा विचार करू देश हिताचा होता एक सारी जनता तमा कशाची बाळगता सर्व जमे

bottom of page